अंतर्ज्ञान ही एक देणगी आहे असा आपल्यापैकी खूप लोकांचा समाज आहे. अंतर्ज्ञान देणारे एखादे सहावे इंद्रिय असावे असेही काहीजणांना वाटते.
आपण रोजच्या रोज बरेच निर्णय घेत असतो. काही योग्य असतात, काही अयोग्य असतात. काही चुकीचे असतात तर काही बिनचूक असतात. निर्णय चुकीचा ठरला तर त्यामुळे आपले नेमके किती नुकसान झाले त्यावर आपण केलेल्या चुकीची किंमत आपण ठरवतो.
कधी कधी आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपले काही नुकसान झाले आहे हेच काहीजण मान्य करीत नाही. अशा व्यक्ती आपल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचे विश्लेषण करण्याच्या फांदातही पडत नाहीत.
काही व्यक्ती मात्र चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचा नीटपणे अभ्यास करतात. समजा प्रत्यक्ष नुकसान झाले नसले तरीही आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीत चुकीचा निर्णय घेतला याबाबत चिकित्सक असतात.अशा व्यक्ती कळत-नकळत आपण नेमकी कशी आणि कोणती चूक केली याचा सखोल अभ्यास करतात. अशा व्यक्ती हळू हळू नेमका आणि बिनचूक निर्णय घ्यावयास शिकतात. काही काळाने असे लक्षात येते की अशा व्यक्तींचा कोणताच निर्णय चुकीचा ठरत नाही. त्यांचे निर्णय सहसा बिनचूक असतात. अशा व्यक्तींना काही अंतर्ज्ञान झाले कि काय किंवा काही तात्कालिक ज्ञान मिळण्याची सिद्धी प्राप्त झाली कि काय असे वाटते.
अंतर्ज्ञान ही काही मंत्र सिद्धी नाही. किंवा असे ज्ञान देणारे कोणतेही सहावे इंद्रिय नाही.आपण घेतलेल्या चुकीच्या व बिनचूक निर्णयाचे सतत विश्लेषण करण्याच्या साधनेमुळे मिळालेली ही अदभूत शक्ती आहे. ती आपल्याला जन्मतःच मिळालेली नसते. प्रयत्नानेच मिळते.
कोणताही निर्णय घेत असताना आपल्याला आपल्या पाचही इंद्रियांच्या तर्फे मिळालेल्या ज्ञानाची गरज असते. पाचही इंद्रियांतर्फे मिळाले ज्ञान संकलित रित्या मांडून त्याचा सांकल्याने विचार करून, त्याच्या साधक-बाधक परिणामांची शक्यता लक्षात घेऊन घेतलेला निर्णय सहसा चुकीच ठरत नाही. इतका की जणू असे निर्णय घेण्याची आपल्याला काही दैवी शक्तीच प्राप्त झाले कि काय असे वाटावे.
अशी साधना कोणीही करू शकते. किनालाही साधू शकते. पंचेन्द्रियांतर्फे मिळालेल्या ज्ञानाचा सर्वांगीण विचार म्हणजेच अंतर्ज्ञान. हि काही जन्मजात देणगी नव्हे.
आपण रोजच्या रोज बरेच निर्णय घेत असतो. काही योग्य असतात, काही अयोग्य असतात. काही चुकीचे असतात तर काही बिनचूक असतात. निर्णय चुकीचा ठरला तर त्यामुळे आपले नेमके किती नुकसान झाले त्यावर आपण केलेल्या चुकीची किंमत आपण ठरवतो.
कधी कधी आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपले काही नुकसान झाले आहे हेच काहीजण मान्य करीत नाही. अशा व्यक्ती आपल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचे विश्लेषण करण्याच्या फांदातही पडत नाहीत.
काही व्यक्ती मात्र चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचा नीटपणे अभ्यास करतात. समजा प्रत्यक्ष नुकसान झाले नसले तरीही आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीत चुकीचा निर्णय घेतला याबाबत चिकित्सक असतात.अशा व्यक्ती कळत-नकळत आपण नेमकी कशी आणि कोणती चूक केली याचा सखोल अभ्यास करतात. अशा व्यक्ती हळू हळू नेमका आणि बिनचूक निर्णय घ्यावयास शिकतात. काही काळाने असे लक्षात येते की अशा व्यक्तींचा कोणताच निर्णय चुकीचा ठरत नाही. त्यांचे निर्णय सहसा बिनचूक असतात. अशा व्यक्तींना काही अंतर्ज्ञान झाले कि काय किंवा काही तात्कालिक ज्ञान मिळण्याची सिद्धी प्राप्त झाली कि काय असे वाटते.
अंतर्ज्ञान ही काही मंत्र सिद्धी नाही. किंवा असे ज्ञान देणारे कोणतेही सहावे इंद्रिय नाही.आपण घेतलेल्या चुकीच्या व बिनचूक निर्णयाचे सतत विश्लेषण करण्याच्या साधनेमुळे मिळालेली ही अदभूत शक्ती आहे. ती आपल्याला जन्मतःच मिळालेली नसते. प्रयत्नानेच मिळते.
कोणताही निर्णय घेत असताना आपल्याला आपल्या पाचही इंद्रियांच्या तर्फे मिळालेल्या ज्ञानाची गरज असते. पाचही इंद्रियांतर्फे मिळाले ज्ञान संकलित रित्या मांडून त्याचा सांकल्याने विचार करून, त्याच्या साधक-बाधक परिणामांची शक्यता लक्षात घेऊन घेतलेला निर्णय सहसा चुकीच ठरत नाही. इतका की जणू असे निर्णय घेण्याची आपल्याला काही दैवी शक्तीच प्राप्त झाले कि काय असे वाटावे.
अशी साधना कोणीही करू शकते. किनालाही साधू शकते. पंचेन्द्रियांतर्फे मिळालेल्या ज्ञानाचा सर्वांगीण विचार म्हणजेच अंतर्ज्ञान. हि काही जन्मजात देणगी नव्हे.