Saturday, 14 July 2018

हिंदू राज्य म्हणजे काय? नरहर कुरूंदकर

"हिंदुराज्य म्हणजे काय?" - हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना एकदा विचारला पाहिजे. भारतीय संविधानात स्मृतींच्या कायद्याविरोधी कोणताही कायदा असणार नाही व जो कायदा स्मृतींच्या विरोधी जाईल, तो कायदा रद्दबातल होईल, असे कलम समाविष्ट करण्यास हिंदुत्ववादी तयार आहेत काय? धर्मशास्त्राप्रमाणे हिंदुराज्य करायचे, तर स्त्रियांचे समानतेचे हक्क रद्द केले पाहिजेत. अस्पृश्यांचे सगळेच हक्क रद्द करून त्यांना शिक्षणबंदी केली पाहिजे. जातीजातींना आपापसात विवाह करण्यास बंदी केली पाहिजे आणि राजसत्तेने ब्राह्मण अवध्य मानला पाहिजे. असल्या प्रकारची हिंदु-धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्यरचना हिंदुत्ववादींना मान्य आहे काय? कारण खऱ्या अर्थाने हिंदुराज्य म्हणजे हिंदू प्रजेची संविधानाने स्वीकारलेली व पुरस्कारलेली गुलामी! इस्लामिक स्टेटची कल्पना याहून निराळी नाही. इस्लामिक स्टेट बिगरमुसलमानांना अधिकार देत नाही, हे केवळ अर्धसत्य झाले. इस्लामिक स्टेट धर्मशास्त्राप्रमाणे मुसलमानांनाही अधिकार देत नाही. अधिकार फक्त धर्मपंडितांचे  उलेमांचे; व हेही अधिकार निरपवाद नाहीत. ते मुस्लिम धर्मशास्त्राला सापेक्ष आहेत. हिंदुराज्य म्हणजे हिंदूंची गुलामी, मुस्लिम राज्य म्हणजे मुसलमानांची गुलामी, मग इतरांची गुलामी त्या (दोन्ही प्रकारच्या) राज्यांत अंतर्भूत आहेच.हे सत्य पाहूनही हिंदुराज्याची कल्पना स्वीकारार्ह वाटणार आहे का?

  - नरहर कुरुंदकर [`जागर' (१९६९) पृ १७३]

Tuesday, 10 July 2018

लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

*🤔लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

📢📢📢📢📢📢📢📢📢📢

👉🏾काय होते या मनुस्मृती*मध्ये जाणून घेऊ या  *संविधान* आणि *मनुस्मृती* यामधील फरकातून:-👉🏾


१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥



*अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.



*२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.



*३) 👉🏾👹मनुस्मृती:-* .[1.88, 98, 90, 130] ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.



*४)👉🏾👹 मनुस्मृती:-* [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

*५)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.



*६)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.



*७)👉🏾👹 मनुस्मृती:-* [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.


*👉🏾📓संविधान:-* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.



*८)👉🏾👹 मनुस्मृती:-* [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.



*👉🏾📓संविधान:-* मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 *९)👉🏾👹 मनुस्मृती:-* [11.127, 129.30, 10.381] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

*👉🏾📓 संविधान:-*  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.

*आयपीसी म्हणजे,*
 इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे.
हा खरा ईतिहास जरुर वाचा..🙏

इंग्रज भारतात आलेच नसते तर?

मित्रहो,
भारताच्या इतिहासाची काही पाने इंग्रज अंमलाची आहेत.त्यांच्या राजवटी विरोधात लिहताना मनुवादी खालील अपप्रचार करतात

1)आम्हाला गुलाम बनवले

2)इंग्रजांनी "फोडा आणि झोडा"नितीचा वापर केला.

3)आमचे धर्मांतर केले

4)आमच्यावर जुलूम केला
आज आपणास हेच पहावयाचे आहे की काय खरेच इंग्रज इतके भयंकर होते?
इंग्रज भारतात आले ते 1600 सालात व्यापार करण्यासाठी.
त्यांनी पहिली गोष्ट न्याहाळली ती म्हणजे भारतात nation-राष्ट्र ही संकल्पना नाही.मात्र जात ही प्रबळ संकल्पना आहे.
जाती या ब्राम्हणांच्या धार्मिक गुलाम आहेत त्यामूळे त्या मानसिक ही गुलाम आहेत.
ब्राम्हण बनिया सोडून सर्व जाती न्यूनगंड आणि नैराश्याने पछाडलेल्या आहेत.
प्रत्येक जात एक राष्ट्रच आहे .त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही.ब्राम्हणांनी प्रत्येक जातीला उपजातीतही विभागून कायमचे फोडले आहे.
इंग्रजांनी असा विचार केला की येथील सर्व जनताच जर ब्राम्हणांची गुलाम आहे तर गुलामांना पराभूत करण्याची गरज नाही.केवळ ब्राम्हणांचे महत्व संपवायचे.बस्स.

1757ला सिराज उद्दौला याचा पराभव इंग्रज का करू शकले.
कारण जगतसेठ,रायदुर्लभ आणिअमीरचंद या तीन ब्राम्हणांचे इंग्रजांना मिळून षडयंत्र करणे होय.
म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात कायम करण्यात सर्वात पुढे ब्राम्हण!
ब्राम्हणांनी असे का केले त्याचे कारण ब्राम्हणांना वाटले मुसलमानी सत्ता गेली तरीही आपणास सत्तेत वाटा मिळेल पण झाले उलटेच

1)इंग्रजांनी प्रथम अस्पृश्य जातींचे सैन्य बनवले.त्यांना प्रशिक्षण दिले.त्यांना शिक्षणसुद्धा दिले.यामूळे ब्राम्हण निराश झाले.

2)इंग्रजांनी पाहिले कि येथील लहान मुलींना ब्राम्हण धर्म धर्म म्हणून पतीनिधनानंतर जिवंत जाळतात.ही पद्धत इंग्रजांनी कायदा करून बंद केली.

3)येथील लोक गुलामीला धर्म मानतात याचे कारण ब्राम्हणांनी येथील लोकांना केलेली शिक्षणबंदी.म्हणून प्रथम येथे इंग्रजांनी शिक्षण सुरू केले.

4)ब्राम्हणांचा "ब्राम्हण पिनल कोड" अर्थात मनुस्मृतीला हद्दपार करून इंडियन पिनल कोड लागू केला आणि "कायद्यासमोर सर्व समान"केले.कलकत्त्यात 1780ला नंदकुमार देव नावाच्या ब्राम्हणाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने बिचारी मुलगी मरण पावली.मनुस्मृतीनुसार नंदकुमार देवची शिक्षा काय तर फक्त शेंडी कापणे.पण इंग्रजांनी तर सरळ त्याला फासावर चढवले.

5)हे राज्य आपणास घातक असल्याचे ब्राम्हणांनी ओळखले आणि त्याचा खातमा करण्याची संधी शोधू लागले.
कलकत्ता फलटणीत हौदावर पाणी पिण्यासाठी मंगल पांडे गेला असता तिथे एक अस्पृश्य जातीचा शिपाई नळावर पाणी पित होता.त्यास मंगलने नळ का बाटवलास म्हणून जाब विचारला. त्या शिपायानेही खतरनाक उत्तर दिले."महाशय तुम्ही ब्राम्हण रोजच गायीची चरबी दाताने तोडता तेव्हा तुम्ही बाटत नाही का?"
हे उत्तर ऐकून मंगलने बंड केले राष्ट्रप्रेम होते म्हणून नव्हे.
या बंडातही ब्राम्हणांनी मुसलमानांना पुढे केले.

6)लाॅर्ड डलहौसीने सर्व राज्ये खालसा करून सर्व भारत एक करण्याचा प्रयत्न केला .ते राष्ट्रीय काम असूनही ब्राम्हण त्याला वाईट म्हणतात कारण राष्ट्रीयत्वाने समाज एक होतो.
बंड तर फसले. मग ब्राम्हणांच्या विनंत्या सुरू झाल्या पण इंग्रज हुशार होते त्यांनी ठरवले की येथील जनतेला मुलभूत अधिकारांची सोय केल्याशिवाय व त्याचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण भारत सोडायचा नाही.
1858 च्या कायद्याने संसद निर्माण केली.
नगरपालिकांची निर्मिती केली.आणि ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

7)सन1909,सन1917,सन1927 लोकशाही निर्मितीसाठी कायदे करून प्रतिनिधित्व दिले.याला गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला त्यात अडाणी जनता साथीदार झाली.

8)इंग्रजांनी 1942 ते1982 हा सक्तीच्या शिक्षणाचा फार्म्यूला बनवला होता.तो जर यशस्वी झाला असता तर आपल्यात स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक निर्माण झाले असते.आणि सच्चे प्रतिनिधी आमच्या समस्या घेऊन संसदेत लढले असते.नोकर्यात sc,st,obcप्रबळ झाला असता
हे होवू नये म्हणून गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला

9)आपणास असे सांगितले जाते की 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज निघून गेले.साफ चूक. संविधान पूर्ण होईपर्यंत इंग्रज भारतात होते.1952च्या प्रथम निवडणूकीनंतर त्यांनी देश सोडला.
इंग्रजांनी आपणास माणसात आणले त्यानाच आपण नावे ठेवतो.इंग्रज आलेच नसते तर भाऊ आम्ही अजून जनावरच असतो
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी "Order" दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेसला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले. या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली.

१ . सदस्य आजारी पडला.

२ . सदस्य विदेशी गेला.

३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला.

४. सदस्य राजकारणात व्यस्त होता.

५. सदस्याचा मृत्यू झाला.

६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे.

7. शेवटी एकट्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..?

१. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा.

२. पंडीत मदन मोहन मालवी उठले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय" ने करा.

३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले "ईश्वर" या नावाने कारा.

4. डॉ. बाबासाहेब उठले आणि म्हणाले "लोकांच्या" नावे करा.

या मुद्द्यावर मतदान झाले "६८ मतं लोकांच्या" नावावर मिळाली आणि "४१ मतं देवाच्या" नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात "we the people of India" "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले.

पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील.. म्हणुन राज्यघटनेतील कलम "३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली
"देव मंदिरात असता,
तर मंदिरा बाहेर बसून भीक मागण्याची वेळ
कोणावरही आली नसती,

*🙏मी देवाला पूजत बसलो असतो तर,माझ्या समाजाला भीक मागायला लागली असती...🙏"*

*डॉ : बाबासाहेंब आंबेडकर*
*मुंबई व इतर शहरे का बुडतात ?* *सतत दुर्घटना का घडतात ?*
अॅड. गिरीश राऊत

 या पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खुप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासुन दूर असलेल्यांना देखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ.

*मुंबईच्या सन १९६४ च्या विकास आराखड्यातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल*. मात्र मुंबईच्या  काँक्रिटीकरणामुळे हे गृहित मोडले गेले आहे.
सन १९९८-९९ सालात आलेला बृहन्मुंबई महानगर पालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की *मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० % काँक्रिटीकरण झाले आहे.* त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो.

६४ च्या पहिल्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, कीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी. *परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण आता फक्त ०•०३ एकर एव्हढेच उरले आहे.* त्यानंतरच्या काळात ते किती कमी झाले असेल त्याची वाचकांनी कल्पना करावी.

मुंबई, सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे याचे कौतुक केले जाते. सन १७८४  सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणा-या सागरातील पहिल्या भरावाचे ( रेसकोर्सपासुन पायधुणीपर्यंत ) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती.  या प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी  केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील  असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली. *त्याचबरोबर महापूराकडे वाटचाल होत राहिली.*

मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनि:स्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या  दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाऱ्या  मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. *तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते*. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा  जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पूराच्या दिशेने वाटचाल झाली. उदा. वांद्रे पूर्व व पश्चिमेच्या सरकारी वसाहती,  नरिमन पॉईंट, लोखंडवाला  काँम्प्लेक्स, पश्चिम उपनगरांचे भराव,  वांद्रे - कुर्ला संकुल इत्यादी भराव. यातील शेवटच्या 'वांद्रे - वरळी'  सागरी  पुलाच्या, मिठी नदीला गाडणाऱ्या, सागरात जाण्यापासुन अडवणार्या भरावाने व खांबांनी, मुंबईसाठी एका मोठ्या दुर्घटनेची व्यवस्था करून ठेवली आहे. काँक्रीटीकरणाला व भरावांना दोष देण्याऐवजी पावसाला व भरत्यांना नाहक दोष दिला जात आहे. २६ जुलै २००५ रोजी महापूराच्यावेळी सायंकाळी दुपारी साधारण ३• ३० पासुन रात्री १०• ३० वाजेपर्यंत मोठी ओहोटी होती. भरती नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या आंधळ्या विकासाचे समर्थक प्रसारमाध्यमांद्वारे जनतेची दिशाभूल करतात याची जाणीव असावी.

उत्तरेकडील  बोरिवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तीनही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासुन ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळ पर्यंत व पूर्वेला घाटकोपरच्या  तीन खाडी टेकड्यांपासुन ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज,  सांताक्रूझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतुन माहीमच्या खाडीत येते. या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव ( त्यापैकी सुमारे ७०० एकर  मॅनग्रोव्ह गाडून ) करून नष्ट केली गेली. तेथून ते पाणी   माहीम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहीम  काॅजवेच्या पुलाखालून पुढे माहीमच्या उपसागरात येणाऱ्या  प्रभादेवी, दादर - शिवाजी पार्क, माहीम व  वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला 'सी लिंक' प्रकल्प अडवतो. हे सर्व विकासाच्या नावे झाले.

*माहीमची खाडी व माहीमचा  उपसागर हे मिठी नदीच्या मुखाचे,  मॅनग्रोव्हचे जंगल असलेले, शहराच्या गाभ्यातील  क्षेत्र हा मुंबईची मूळ बेटे आणि उपनगरे यामधील दुवा आहे.* शहराच्या जीवनरेखा असलेल्या तीनही रेल्वे माहीमच्या खाडीच्या खाजण क्षेत्रातून जातात.  पूराच्या  दुर्घटनांच्या निवारणाच्या द्रृष्टीने तो अतिशय महत्वाचा  आघातशोषक आहे. परंतु याची जाणीव नियोजनकर्त्यांना नाही.
केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे  बुडत आहेत. नागपूरातही तेच  घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला 'मुंबई', त्यानंतर २८ ऑगस्टला 'न्यू ऑर्लीन्स व त्या पाठोपाठ 'शांघाय' सन २००५ मधे बुडाली.

अमेरिकेत 'ह्यूस्टन' शहरासह  पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे  'हार्वे' नाव दिलेले अभूतपूर्व अतिवृष्टी करणारे ताशी सुमारे २४० कि मी वेगाचे  चक्रीवादळ आठवडाभरात दोनदा आदळले. अशावेळी खाड्या, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडण्याची व सागरी रस्ते व भुयारी रेल्वे,  रस्ते करण्याची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे.

 *तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील बाॅन येथे झालेल्या युनोच्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते जाहीर झाले आहे. एव्हढा 'कार्बन डाय ऑक्साईड' वायू  वातावरणात साठला आहे की, त्याच्या उष्णता शोषण्याच्या गुणधर्मामुळे तापमान वाढतच राहणार आहे. कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश तात्काळ  न थांबवल्यास मानवजात व जीवसृष्टी या शतकात नष्ट होणार आहे. म्हणजे *औद्योगिकरण व शहरीकरण हा शाप ठरला आहे.*

महासागरांचे पाणी आणि पर्वत व धृव प्रदेशांवरील बर्फाची, वाढत्या प्रमाणात वाफ होत आहे. वातावरणातील हजारो वर्षांची    रूढ अभिसरण पध्दती मोडली आहे. प्रचंड प्रमाणावरील वाफेचे अनियमित वितरण होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होताना ऐतिहासिक स्वरूपात अनेक महिने वा वर्षांत होणारा पाऊस एका दिवसात किंवा काही तासांत पडत आहे.* त्याला वादळाची साथ मिळाल्यास जणू प्रलय होत आहे. शहरे 'उष्णता बेट' परिणामामुळे कमी दाबाचा पट्टा तयार करून याला आमंत्रण देत आहेत. बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या सागराच्या पातळीतील वाढीमुळे  मुंबई, न्यूयाॅर्कसह जगातील सर्व शहरी, ग्रामीण किनारपट्ट्या येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत. आपल्याकडे मात्र तापमानवाढीला अधिक वेग देणाऱ्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याच्या चर्चा जोरात चालू आहेत. आमचे उद्योग व वित्तीय क्षेत्र भ्रमात आहे. जणू ते मुंबई  नावाच्या एका वेगळ्या ग्रहावर आहेत. प्रसारमाध्यमे हितसंबंधामुळे किंवा त्यांचा सहभाग असल्यामुळे
याला हातभार लावत आहेत. आपले हित अर्थव्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानकेंद्री जीवनशैली जपण्यात नसून जीवन जपण्यात आहे हे या सर्वांनी वेळ न गमावता लक्षात घ्यावे.

मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. नासाने व युनोच्या 'आय पी सी सी' ने हे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईचा काँक्रिटीकरणरूपी विकास थांबवायला हवा. *मेट्रो प्रकल्प व त्यातही  'मेट्रो - 3' हा भुयारी रेल्वे प्रकल्प व 'सागरी रस्ता' हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज  आहे. *माती व मान्सूनपेक्षा मोटारींना महत्व देणे ही चूक आहे.* कारच्या टायरना माती लागू नये म्हणून बहुतेक इमारती व सोसायट्यांमधील जमीन काँक्रीट वा लाद्यांनी आच्छादली जाते. हे संकटाला निमंत्रण आहे.

वांद्रे - कुर्ला संकुल, मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वांत खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये म्हणून त्याची व त्यातील  रस्त्याची उंची वाढवली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील    कलानगर, सरकारी वसाहत इ. भाग खालच्या पातळीला गेले. तेथील इमारतींच्या  तळ मजल्याच्या वर  संकुलाच्या  रस्त्याची पातळी आहे. असाच प्रकार सागरी रस्त्यामुळे पूर्ण मुंबईबाबत घडणार आहे. मुंबईतील पाणी बाहेर पडणार नाही. असा रस्ता म्हणजे देखील दुर्घटनेला समजुन उमजून आमंत्रण आहे.

आम्ही वरळी-वांद्रे सागरी पुल प्रकल्पाविरूध्द प्रखर आंदोलन केले. मच्छीमारांनी वांद्रे  भूशिराच्या जवळ समुद्रात, क्रेनमधुन टांगलेल्या एक - दोन टन वजनाच्या मोठ्या  दगडांखाली सतत आठ -दहा दिवस होड्या व बोटी लावुन, जीव धोक्यात घालून भराव थांबवला. मुंबई वाचवण्यासाठी  वांद्रे व वरळी या भूशिरांमधील भागांत व प्रभादेवीच्या समुद्रात भराव करू दिला नाही. माहीम काॅजवेच्या पश्चिमेकडील मिठी नदीला अडवत असलेला  भरावाचा काही  भाग व सागरी पातमुख प्रकल्पाच्या भिंती काढुन टाकावयास लावल्या. माहीमच्या खाडीत झोपडपट्ट्या करण्याचे प्रयत्न थांबवले. म्हणून मिठी नदी बर्‍याच प्रमाणात मोकळी झाली व मुंबईची जलसमाधी टळली. २६ जुलै २००५ च्या दुर्घटनेत होणारे लाखो लोकांचे मरण टळले. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.

*मुंबईला आता  doing ची नसून  undoing ची गरज आहे.* सी लिंक प्रकल्प मुंबईसाठी संकट आहे. तो बंद करून काढून टाकावा. माहीम काॅजवे ते वांद्रे भूशिरापर्यंत केलेला भराव व त्यावरील रस्ता ( येथे पूल बांधला नाही ) हा मागास व हास्यास्पद आहे. त्यामुळे समुद्राची कोंडी होऊन भरत्या मुंबईच्या पर्जन्यवाहिन्यांमधुन उलट शहरात शिरतात. पूर्ण वांद्रे - कुर्ला संकुल ( बी के सी )   मिठी नदीच्या मूळ प्रवाहासह, सागराच्या भरती व ओहोटी रेषांमधील क्षेत्राला गाडून उभे आहे. अशा स्थितीत सर्व नाले , नलिका स्वच्छ आहेत,  गाळ  प्लास्टिक इ. घनकचर्यापासुन मुक्त आहेत, अशी कल्पना केली तरी मुंबई बुडणार आहे. सर्व शहर जलमय झाल्यावर पंप काय कामाचे. साठलेले पाणी एका ठिकाणी उचलून, टाकणार कोठे ? बी के सी मधील इमारती न बांधलेला भरावाचा भाग तर तातडीने काढून टाकावा. जमिनीच्या किंमतीचा विचार करू नये.

'मेट्रो ३ भूयारी रेल्वे' हा बोगस प्रकल्प आहे. तो नियोजनात नव्हता. कोणत्याही वाहतुक अभ्यासाने त्याची शिफारस केली नाही. 'हा प्रकल्प ३० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता', हे  याबाबतचे न्यायालयाचे विधान चुकीचे आहे. एम एम आर डी ए ने नागरिकांना दिलेल्या पत्रात कारणे देऊन, मुंबईत भूयारी रेल्वे करू नये असे म्हटले आहे. त्यात मुंबई बुडण्याचे कारणही आहे. प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी म्हणतात की, हरित ऊर्जा वापरू. याबाबत नागरिकांनी किती वीज वापरली जाणार ? व ऊर्जेबाबत  इतर माहिती विचारली. यावर, मेट्रो ३ हा प्रकल्प सुरू झाल्यावर ही माहिती देऊ असे मासलेवाईक, बेजबाबदार उत्तर एम एम आर सी एल कडून मिळाले. या प्रकल्पात ६७३ झाडे तोडली जातील असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्षात सुमारे १५००० पेक्षा जास्त झाडे आतापर्य॔त तोडली गेली. माहीमच्या खाडीतील मॅनग्रोव्ह जंगल तोडले गेले. सन २०११ मधे या प्रकल्पाचा खर्च २४ ३४० कोटी रू. दाखवला आहे. तो आता वाढत ५००००  कोटी रूपयांवर गेला असा अंदाज आहे. तो अजून वाढेल.  प्रकल्पामुळे मुंबईकरांचे आताच हाल होत आहेत. ९०  ते १२० फूट खोल असल्याने भविष्यात तो मुंबईकरांना बुडवून मारणार आहे असे दिसते. एलफिन्स्टन पुलावर दिवसाढवळ्या घडणारी दुर्घटना हाताळता येत नाही तर १०० फूट खाली माणसांना कसे वाचवणार ?

 फक्त २००० कोटी रूपयात बेस्ट बसचा ताफा दुप्पट, तिप्पट करून व कर्मचार्यांचे   इतर प्रश्न सोडवून मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. गेल्या ३० वर्षांतील सर्व अहवालांनीदेखील बसला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. पण त्याविरूध्द जाऊन अनावश्यक बांधकामयुक्त महागड्या प्रकल्पांचा मारा करण्यात आला. याला बहुतेक मुंबईकरांची, स्वतःला आधुनिक मानून, पटकन खुळावली जाणारी  तंत्रज्ञान संमोहित मानसिकतादेखील कारण आहे. प्रकल्पकर्ते तिचा खुबीने वापर करतात. मुंबईत ठिकठिकाणी जमीन खचत आहे हे दिसत असताना मेट्रो ३  प्रकल्प होऊ दिला तर नंतर अश्रू गाळून उपयोग नाही.
प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याची व तो रद्द करण्याची गरज आहे.

बर्याच  नागरिकांना युरोप, अमेरिकेचे वेड आहे.  तेथील जीवनशैली येथे यावी म्हणून ते आसुसलेले आहेत. त्यावर बोट ठेवून, आपण काहीही खपवू शकतो अशी संबंधित राजकारणी, नोकरशहा, कंपन्या, अभियंते इ. ना खात्री आहे. ते कोणतीही घातक गोष्ट करताना, आपल्याला विकास नको का ? आपण मागास राहणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर नागरिक मागे हटतात व आपण प्रगतीचे विरोधक ठरू नये या भावनेने पूर्ण चुकीच्या प्रकल्पाला विकास मानून, होकार देऊन बसतात.
नागरिकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कृपया याला नकारात्मक विचार समजू नये. *हा ज्ञानावर आधारित वास्तवाचे भान ठेवणारा, जीवनाची व ते देणाऱ्या  पृथ्वीची जपणुक करणारा पूर्ण होकारात्मक विचार आहे.* आम्ही सर्व जे काम करतो ते नकारात्मक, निराशावादी विचाराचा माणुस करू शकत नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.

तापमानवाढीचे सतत भान हवे. *दर वर्षी १/५° से म्हणजे पाच वर्षात १°से अशी  इतिहासात कोट्यावधी वर्षांत न झालेली अभूतपूर्व  वाढ पृथ्वीच्या  सरासरी तापमानात होत आहे.  फक्त येत्या  ४ वर्षांत  सन १७५० च्या तुलनेत २°से ची वाढ  होत आहे.  माध्यमे सांगतात त्याप्रमाणे सन २१०० मधे नाही. मानवजात वाचविण्यासाठी केलेला  'पॅरिस करार' अयशस्वी ठरत आहे.* भविष्यातील वादळांची व अतिवृष्टीची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कॅनडात आत्ता उष्णतेची अभूतपूर्व लाट चालू आहे. आतापर्यंत ५०  च्या वर माणसे मरण पावली. जपानमधे तासाला चार इंच असा ऐतिहासिक विक्रमी पाऊस पडत आहे. महापूर आला आहे. ३० लाख  नागरीकांना सुरक्षित जागी हलवले जात आहे व ५० ००० माणसे सुटका करण्याच्या कामाला लावण्यात आली आहेत. या घटनांची जाणीव हवी. त्याऐवजी राजकारण, मनोरंजन, युध्द, उद्योग, तंत्रज्ञान, अर्थव्यवहार अशा बिनमहत्वाच्या हानिकारक  गोष्टीत जग गुंतले आहे.

 विकासाच्या संमोहनातुन तात्काळ बाहेर पडणे आवश्यक आहे. *मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली  जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तरच  कार्बनचे उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश थांबेल.  तसे केले नाही तर औद्योगिकरण कोसळण्याच्या प्रक्रियेबरोबर जीवनही नष्ट होईल.* आशियातील औद्योगिकरणाचे प्रतीक असलेल्या  मुंबईतील दुर्घटना मोठ्या अनर्थाची नांदी आहेत.
धन्यवाद,

आपला
गिरीश राऊत

निमंत्रक : मुंबई रक्षण समिती / भारतीय जीवन व   पर्यावरण चळवळ

दू. क्र. ९८६९ ०२३१२७ व्हाॅ. अॅप.
         ०२२ २४३७८९४८
कृपया सर्वत्र पाठवा.

Sunday, 24 June 2018

योग दीना निमित्त -अशोक पानसरे, हैद्राबाद.

योग वैदिक कि अवैदिक??
**********************

योगशास्त्र हे वैदिकांचे नसून अवैदिकांचे आहे. ते श्रमण परंपरेतून विकसित झालेले आहे. परंतु सध्या योग पतंजलीच्या नावावर खपवला जात आहे. स्वतः पतंजली योगशास्त्र बौद्ध विद्यापीठात शिकला. पतंजली आपल्या भाष्यात म्हणतो, "योगशास्त्रे सांख्य प्रवचने", म्हणजे योग सांख्यांचा आहे असे तो स्वतः कबूल करतो. सांख्य तत्वज्ञान हे निरीश्वरवादी दर्शन आहे. त्यांनी उपनिषदातील ब्रम्ह नाकारून सृष्टीच्या उत्पत्तीला प्रकृती आणि पुरुष कारणीभूत आहेत हा सिद्धांत मांडला. "प्रकृती हे सृष्टीचे अव्यक्त(Hidden) रूप आहे, त्यात विकृती निर्माण झाली की सतत परिवर्तने होऊन त्यातून विविध मूलद्रव्य निर्माण होतात. नवीन असे काहीच निर्माण होत नाही, उलट जे अव्यक्त स्वरूपात आहे तेच व्यक्त स्वरूपात प्रदर्शित होत राहते." सांख्य तत्वज्ञानाचा प्रवर्तक कपिलमुनी आहे, त्यानेच बुद्धाच्या कपिलवस्तु या नगराची रचना अक्षपटा सारखी केली.

कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात म्हणतो की योग बृहस्पतीचा आहे. बृहस्पती चार्वाक परंपरेतील आहेत म्हणून तेही निरीश्वरवादी आहेत, त्यांनी वैदिकांच्या तीन वेदांची खिल्ली उडवलेली आहे.
"त्रयो वेदस्य कर्तारा भंड धूर्त निषाचरः"

हिंदू धर्माचे आद्यशंकराचार्य आपल्या शांड्करभाष्य या ग्रंथात बुद्धाला "योगाणाचक्रवर्ती" म्हणत आहेत!!

सांख्य निरीश्वरवादी, बृहस्पती निरीश्वरवादी, बुद्ध निरीश्वरवादी.

मग योग कुणाचा? वैदिकांचा कि अवैदिकांचा?

अशोक पानसरे, हैद्राबाद.

Wednesday, 30 May 2018

कोब्रापोस्ट – भारतीय प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश

पुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी भारतीय पत्रकारितेतील सर्वात विलक्षण प्रयोग नुकताच पार पाडला. हा प्रयोग म्हणजे खरतर भारतीय शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठा व क्रांतिकारी अविष्कार आहे. प्रयोगाचे नाव कोब्रापोस्ट ने ठेवले आहे ऑपरेशन १३६. या प्रयोगाचे निष्कर्ष अर्थातच मुख्य प्रवाहातील मीडिया साफ दाबून टाकण्याचा यत्न करेल, परंतु भारतातील अगदी नावाजलेल्या वृत्तपत्र समूहांची नैतिकता काय लायकीची आहे याचे सांगोपांग दर्शन घडविणारा कोब्रापोस्टचा हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचविण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपणा सर्वांचीच आहे.

आचार्य अटल असे नाव धारण करून, सफेद कुर्ता, धोतर,” राधे राधे” छापलेली रेशमी उपरणे अशा अवतारात पुष्प शर्मा नामांकित वृत्तसमूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मालकांना भेटला. मी झुंझुनू राजस्थान येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून नंतर आयआयटी दिल्ली व आयआयएम बेंगलोर येथून उच्चं शिक्षण घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात सेटल झालो, मी एक इ गेमिंग कंपनी स्कॉटलंड मधून चालवितो परंतु मुळात माझी कमिटमेंट हिंदुत्वाशी आहे. उज्जैन येथील एका आश्रमाशी मी जोडलेला आहे. भारतात हिंदुराष्ट्र कायम व्हावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत, आणि त्यासाठी हात सोडून खर्च करायची आमची तयारी आहे. बोला आपण आमच्या अजेंड्यावर काम कराल काय? त्यासाठी काय किंमत घ्याल अशी विचारणा आचार्य अटल या बड्या प्रसारमाध्यमांतील अधिकारी/मालकवर्ग/पत्रकार/ संपादक अशा मंडळीकडे करीत असे. या सर्व मुलाखती शर्माने गुप्त कॅमेरावर रेकॉर्ड केल्या. कोब्रापोस्टने हे व्हिडियो आपल्या पोर्टल वर टाकले. २४ मे २०१८ रोजी या स्टिंग ऑपरेशनचा दुसरा भाग प्रकाशित व्हायचा होता, दैनिक भास्कर या वृत्त समूहाने उच्चन्यायालयात धाव घेऊन त्यांना बेनकाब करणारे व्हिडियो प्रकाशित करण्यास मनाई करणारा हुकूम आणला.
बर, तर परत एकदा आचार्य अटलने नेमकी काय गाजरे या प्रसारमाध्यमांना दाखविली याकडे वळू. आचार्य अटल देशभर फिरला. हिंदुत्वाची सुपारी घ्यायची तयारी एखाद्या मीडिया हाऊस ने दाखविली की आचार्य अटल आपल्या प्रसार मोहिमेचा नेमका आराखडा मांडत असे. व त्यातील प्रत्येक बारकाव्यावर साधक बाधक चर्चा करून कंत्राट स्वीकारणारे मीडिया हाऊस या मोहिमेतील हरेक पायरी कंत्राट देणाऱ्यास अभिप्रेत आहे त्या प्रकारे पार पाडेल यावर सहमती मिळवत असे. त्यानंतर हे करण्यासाठी किती मोबदला कोणत्या स्वरूपात द्यावा लागेल यावर आचार्य अटल या महानुभावांबरोबर घासाघीस करीत असे.
आचार्य अटलने या सर्वच नामचीन वृत्तसमूहांसमोर, साधारण एकच प्लान ठेवला. त्यात सुरवातीचे काही महिने या वृत्तसमूहांनी त्यांना ‘पुरविण्यात’ येणारा कन्टेन्ट आपल्या वृत्तपत्रात, वाहिनीवरून “पेरायचा” होता. हा कन्टेन्ट साधारणपणे भाजपाच्या राजकीय विरोधकांची, विशेषतः राहुल गांधी, मायावती, अखिलेश, लालू यांची प्रतिमा मालिन करणाऱ्या वृत्तांच्या स्वरूपात असणार होता. या बरोबरीने पहिले तीन महिने मृदू हिंदुत्ववादी लाईन सदर वृत्तसमूहाने घ्यावी अशी अपेक्षा होती. जसजशी २०१९ ची निवडणूक जवळ येईल तसतसे सरळ सरळ भाजपाच्या बाजूने पक्षपाती बातम्या छापाव्यात/ प्रसारित कराव्यात अशी अपेक्षा होती.
आपल्याला नेमका कशा प्रकारचा अपप्रचार करून हवाय, हे स्पष्ट करण्यासाठी मुलाखतीच्या सुरवातीलाच आचार्य अटल दोन ध्वनिमुद्रित जिंगल्स वाजवून दाखवायचा. त्यातील पहिल्या जिंगल मध्ये एक नेता एका शेतकऱ्याला विचारतोय की तुमचे पाय एवढे मळलेले कसे काय? शेतकरी म्हणतो, बेटा, शेतात माती असते, पाय तर मळणारच. नेता म्हणतो- अरे असं आहे काय? काय काळजी करू नका भाऊ, मी निवडून आलो कि सगळ्यांच्या शेतात फरशी बसवून देईल. त्यावर एक धीरगंभीर आवाजात टिपण्णी येते- आपले अमूल्य मत अशा पप्पूला देऊन फुकट घालविणार का ? भगवद गीता समिती कडून लोकहितार्थ जारी.
दुसऱ्या जिंगल मध्ये एका गावकऱ्यांस एक नेता विचारतो, की तुम्हाला गावात काय सुविधा हव्यात? गावकरी सांगतो, बाकी वीज पाणी रस्ते सर्व काही आहे, पण स्मशानासाठी फार लांब जावे लागते. नेता सांगतो “बिलकुल काळजी करू नका. मी निवडून आलो कि प्रत्येक घरात एक स्मशान बांधून देईन” . परत धीरगंभीर आवाजात टिपण्णी येते- आपले अमूल्य मत अशा पप्पूला देऊन फुकट घालविणार का ? भगवद गीता समिती कडून लोकहितार्थ जारी.

आचार्य अटल पुढे सांगायचा कि गेल्या निवडणुकीत आमच्या “संगठन का” बजेट ८००० कोटी होते, या खेपेस ते खूप जास्त असणार आहे. पैशाची कमी नाही, प्रचार बरोबर झाला पाहिजे. वृत्तसमूहातील धुरिणांना शर्माचे एकूण रूप, भाषा, व “प्रपोजल’ पाहून समोर सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच बसल्याचा भास होत असे. त्यातील अनेकांनी हावऱ्या प्रमाणे आचार्य अटलचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून टाकला, काहींनी तर हा हिंदुत्ववादी अजेंडा अजून कसा चांगल्याप्रकारे राबविता येईल याबद्दलच्या आपल्या कल्पना आचार्य अटलला इमेल करून कळविल्या.

सध्या “राष्ट्र्वादा” ची चलती आहे. हिंदुत्ववादी मालकांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी स्वतःस सुसंगत करून घेण्याची चढाओढ मीडिया मधेही स्पष्ट दिसून येते. सरहद्द विरहित पत्रकार या जागतिक संघटनेने केलेल्या २०१७ सालच्या सर्व्हेत, लेखन स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत १३६ व्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावरूनच कोब्रापोस्टने आपल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव १३६ असे ठेवले आहे.

कोठला विचार राष्टवादी आहे व कोणता राष्ट्रद्रोही आहे हे अतिशय कर्कश्य पणे जाहीर करणाऱ्या संघटना आहेत व त्यांना राजसत्तेचे अभय आहे, हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारांस सोशल मीडियावर धमक्या देणे, फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी स्वतःवर आपणहून अभिव्यक्ती मर्यादा घालून घेतल्याचे दिसून येते, असे हे सर्वेक्षण नोंदवते.

याहून महत्वाचे निरीक्षण खुद्द पुष्प शर्माने नोंदविले आहे. आचार्य अटल या नावाने भेटीगाठी झाल्यानंतर, ज्या वृत्त समूहांनी आचार्य अटलचा अजेंडा राबविण्यास होकार दिला होता, त्याना पुष्प शर्माने परत फोन करून अजून चित्रविचित्र मागण्या समोर ठेवल्या. कॅम्पेनचा भाग म्हणून, अरुण जेटली, मनेका गांधी, वरुण गांधी, जयंत सिन्हा, मनोज सिन्हा यांची प्रतिमा मालिन करायचे काम हाती घायचे होते. शेतकरी चळवळी व निदर्शने हे माओवाद्यांचे कारस्थान आहे असे रंगवायचे होते. त्यानंतर सिव्हिल सोसायटीमधील, नागरी हक्कांसाठी आग्रही असणाऱ्या प्रशांत भूषण, दुष्यन्त दवे, इंदिरा जयसिंग अशा मंडळींची बदनामी करणारी मोहीम चालवायची होती. त्यानंतर न्यायव्यवस्थेच्या “न्यायी” भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या बातम्या, कन्टेन्ट प्रसृत करायची मागणी होती.
आपल्या “राष्ट्रवादी” प्रसार माध्यमांनी आचार्य अटलच्या ह्या मागण्या पूर्ण करण्यास साफ नकार दिला असे जर तुम्हाला वाटले असेल, तर तुम्ही अतिशय भाबडे आहात. हे सर्व करण्यास आपली प्रसार माध्यमे एका पायावर तयार झाली. याचा अर्थ एवढाच, की ही मंडळी स्वतःच्या बापाचीही नाहीत. पुरेसे पैसे मिळणार असतील तर हे लोक कसलीही मोहीम चालवितील.

टाइम्स ग्रुप हा भारतातील सर्वात शक्तिशाली मीडिया हाऊस आहे. त्यांचे टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आज १७९ वर्षाचे आहे. जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश वृत्तपत्र असा त्याचा लौकिक आहे. सर्व आवृत्या मिळून त्याचा रोजचा खप तीन करोड च्या वर आहे. टाइम्सचा पसारा मोठा आहे. त्यांची पाच वृत्तपत्रे आहेत, एकतीस मासिके आहेत, बत्तीस रेडियो स्टेशन्स आहेत. एकूण ११ हजार कर्मचारी इथे काम करतात. निर्भय व निरपेक्ष पत्रकारिता टाइम्स ग्रुप मध्ये केली जाते असा एक सर्वसामान्य समज भारतात आहे. अशा या नामचीन वृत्तसमूहाचा पर्दाफाश पुष्प शर्माने कोब्रापोस्ट मध्ये केलेला आहे.
फक्त टाइम्स ग्रुपचं नाही तर वृत्तव्यवसायातील दिग्गजांना पुष्प शर्माने उघडे पडले आहे. या यादीत कोण नाही ? इंडिया टीवी, दैनिक जागरण, सब टीवी, अमर उजाला, समाचार प्लस, पंजाब केसरी, एच एच एन २४ X ७, स्वतंत्र भारत, स्कुपव्हूप, रेडीफ, टीव्ही १८, हिंदुस्थान टाईम्स, ए बी पी न्यूज, भारत समाचार, लोकमत, इंडिया टुडे ग्रुप, के ग्रुप, न्यू इंडियन एक्सप्रेस, स्टार इंडिया, या सगळ्यांनाच पुष्प शर्माने अक्षरशः नागडे केले आहे. यातील प्रत्येकाची पुष्प शर्मा बरोबरची सविस्तर मुलखात कोब्रा पोस्टच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
बाकी इंडिया टीव्ही ,ए बी पी न्यूज वैगेरेच स्टिंग ऑपरेशन पाहून आपल्याला धक्का बसायचं कारण नाही. पण टाइम्स ग्रुप जर अशा तर्हेची ‘म्याटर’ वाजवत असेल, तर आपल्या लोकशाहीचा एक आधारस्तंभ किती ठिसूळ झालेला आहे याची कल्पना येते. पुष्प शर्माने केलेले टाइम्स ग्रुप मधील स्टिंग ऑपरेशन इथे मुद्दाम सविस्तर देत आहे.

रेडियो मिरची हा एफ एम चॅनेल हा टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा आहे. भारतातील अडतीस शहरात लोक सकाळ दुपार संध्याकाळ हा चॅनेल ऐकत असतात. हा एफ एम चॅनेल जाहिरातीसाठी अव्वल समजला जातो कारण करोडो लोकांपर्यंत तो रोजच पोचत असतो. प्रदीप व्ही या रेडियो मिरचीच्या जाहिरात विभागाच्या प्रमुखा बरोबर झालेल्या मुलाखतीचे स्टिंग कोब्रापोस्ट वर आहे. शर्मा या प्रदीप व्ही ना सांगतात की आम्हाला आमचा राजकीय अजेंड्यास पूरक असा ‘कंटेन्ट’ तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसृत करायचा आहे. “म्हणजे नक्की कसा कन्टेन्ट ?” प्रदीप व्ही विचारतात. शर्मा त्यावर काँग्रेस व राहुल गांधींची प्रतिमा मालिन करण्याचा प्लॅन नीट उलगडून सांगतात. त्यावर प्रदीप व्ही जी काही प्रतिक्रिया देतात त्यावरून कळते की हे चारित्र्य हननाची सुपारी घ्यायला ते एका पायावर तयार आहेत, एवढेच नाही तर हेच काम ते अगदी अलीकडे पर्यंत ते व्यवस्थित पार पाडत आलेले आहेत. प्रदीप व्ही उत्साहाने सांगतात की अहो हे काम निवडणूक काळात आम्ही उत्तम केलेले आहे. भाजपाची अशा स्वरूपाची इतकी कँपेन आम्ही चालवलीत, इतकी कँपेन चालवलीत, की आता मला नेमका आकडाही सांगता येणार नाही. एक मॅडिसन नावाची एजेन्सी होती, त्यांच्या मार्फत हे काम आम्हाला मिळत असे. इथे पुष्प शर्मा शिताफीने या प्रदीप व्हीना बोलत करतात. प्रदीप व्हीच्या तोंडून अशी माहिती बाहेर पडते कि खुद्द भाजपाच्या कमिटीने एका एजेंसी मार्फत रेडियो एफ एम ला कंत्राट दिले होते. प्रदीप व्ही पुढे शर्माला सांगतात कि थेट व्यहवार करण्यापेक्षा आचार्य अटलच्या आश्रमाने एखादी त्रयस्थ एजेन्सी धरावी व त्यांच्या बरोबर पैशाचा व्यहवार करावा. त्या त्रयस्थ एजेंसी बरोबर आम्ही – म्हणजे रेडियो एफ एम, व्यहवार करेल, रोकडित व्यहवार करायचा असेल तर उत्तमच. ते सगळ्यांनाच सोयीचे पडेल.

त्यानंतर पुष्प शर्मा रेडियो मिरचीच्या पाटणा ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना भेटला. त्यापैकी रेडियो मिरची पटना चे प्रमुख प्रभू झा यांनी तर शर्मास सांगितले की त्यांना ज्या तर्हेचे काम हवे आहे, उदाहरणार्थ गीतेतील श्लोक उचलून ते सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य म्हणून वापरायचे व त्यातून भाजपा विरोधकांची प्रतिमा मालिन करणारा संदेश बिंबवायचा, हे काम करण्यासाठी मी तुमची भेट आमच्या स्क्रिप्ट रायटरशी घालून देतो. तो एक नंबर काम करून देईल . आचार्य अटलला भेटून या प्रभू झा यांना बंधुप्रेमाचे भरतेच आले, त्यांनी शर्मन सांगितले की, अहो मी पण आर एस एस चाच माणूस आहे. तुमचे काम म्हणजे माझे काम. मी काय, आमचे इकडचे प्रोग्राम हेड काय, आमची जडण-घडण संघातच झाली आहे. गेल्या खेपेस सुद्धा आम्ही इथे भाजपाची प्रचार मोहीम चालविण्याचे कंत्राट घेतलेच होते की. प्रभू झानी शर्माला असेही सांगितले कि आमची अख्खी टीमच “त्याच” विचाराची आहे. आम्ही सगळी माणसे, त्यांची पार्श्वभूमी पाहूनच घेतो, त्यामुळे तुम्हाला दहा ठिकाणी जायची गरज नाही. तुमचं टार्गेट फक्त सांगा, आणि टार्गेटची प्रतिमाभंजन करण्याचे काम माझी क्रिएटिव्ह टीम चोख पार पाडेल.

पुष्प शर्मा एवढ्यावर थांबला नाही, त्याने नंतर मंगलोर ऑफिस मध्ये एरन डिमेलो बरोबर हिंदुत्वाचा अजेंडा, करमणुकीच्या कार्यक्रमांतून गुंडाळून कसा पेश करता येईल याची चर्चा केली. खरतर डिमेलोंनेच त्याला सांगितलं की आम्ही थेट टीका नाही करू शकणार नाही पण मनोरंजनाच्या कार्यक्रमातून हा पेड प्रचार किंवा अपप्रचार बेमालूमपणे पेश करता येईल. त्यानंतर शर्मा गुवाहाटीला जाऊन टाइम्सच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अंशुमन डे यांना भेटला. डे कडे शर्माने बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न काढला. डे त्याला म्हणाले कि असे इश्यू एक तर संपादकीयातून मांडता येतील किंवा “प्रायोजित” संपादकीयातूनही रेटता येतील. तुम्ही कंटेन्ट द्या, आम्ही तो बरोबर वृत्तपत्रीय भाषेत सादर करू. मीडिया जगतात या प्रकाराला “ऍडव्होटोरियल” या नावाने ओळखले जाते. पण डे सारखा शर्माला आम्ही तुमची जाहिरात कशी करत राहू त्याचे मार्ग सांगत राहिला. शर्माने जेव्हा विरोधकांवर वार करण्याची गोष्ट काढली तेव्हा डे त्याला म्हणाला की ते फार सावधानीपूर्वक करावं लागेल.

त्यानंतर शर्मा हैदराबाद येथील टाइम्सचा डेप्युटी जनरल मॅनेजर, विजय भास्कर रेड्डी यांना भेटला. रेड्डी स्वतःच हिंदुत्ववादाने भारून गेलेले होते असे शर्मास वाटले, लव्ह जेहाद चा मुद्दा तापवत ठेवणारी एखादी मोहीम सुरु करायची झाली तर तुम्ही सहकार्य कराल का असे शर्माने त्यांना विचारले. रेड्डी म्हणाले “हो जायेगा” ! या नंतर शर्मा, दिल्ली रेडियो मिरचीचे मुख्य अधिकारी विजय प्रताप सिंग याना भेटला. चंदीगढचे डेप्युटी मॅनेजर विशाल गुलेरी यांची भेट घेतली पुढे लखनौ मध्ये नवभारत टाइम्सचे चीफ मॅनेजर बिपीनकुमार याना भेटला. सगळेच “धंदा” करण्यास आनंदाने तयार होते. बिपीनकुमार तर शर्माना म्हणाले की मोदी शहा जोडगोळी आमच्या पेपर वर नाराज आहे. त्यामुळे सरकारी जाहिराती पूर्वीसारख्या मिळत नाहीत. विरोधकांचे चारित्र्यहनन करून मोदी शहांची मर्जी संपादन करता आली तर चांगलेच आहे.

या सगळ्या स्टिंग ऑपरेशनचा कळस म्हणजे शर्मा थेट टाइम्स ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट संजीव शाह व त्यापाठोपाठ टाइम्स ग्रुपचे सर्वेसर्वा विनीत जैन यांना भेटला. संजीव शाह याना शर्माने आपला अजेंडा श्रीकृष्ण व भगवद गीतेपासून सुरवात करून देशभरात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्याचा असल्याचे स्वच्छ शब्दांत सांगितले. संजीव शहा यावर “करेक्ट, करेक्ट, बस वही” असे उदगार काढत राहिले. त्यानंतर शर्माने विनीत जैन यांची भेट घ्यायची वार्ता सुरु केली, त्यावर संजीव शहा जरा आढेवेढे घेऊ लागले. म्हणाले, की मी एकदा विनीत बरोबर बोलून घेतो, कस आहे, की आम्ही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. ही मिटिंग अतिगुप्त ठेवावी लागेल.

त्यानंतर शर्माला विनीत जैन यांची अपॉइंटमेंट मिळाली, परंतु तत्पूर्वी संजीव शहाबरोबर अजून एक मिटिंग पार पडली. संजीव शहा त्यांना म्हणाले की विनीत माझ्यावर जाम उखडलाय, कारण मी या सगळ्यात पैशाचं काही ठरवलंच नाही. विनीत जैनना तुमचा एकंदर अजेंडा दाखविल्यावर त्यांचं म्हणणं पडलं की हे राबवायचे किमान हजार कोटी द्यावे लागतील. मी म्हंटले काय विनीत, हजार कोटी कोण देईल, कस शक्य आहे ? तर विनीत म्हणाले ठीक आहे, पण ५०० कोटीच्या खाली बातच करू नका. अखेरीस शर्माची विनीत जैनबरोबर भेट करून देण्यात आली. जैन त्याला म्हणाले की तुमचा अजेंडा वैगेरे ठीकच आहे, परंतु आमची विश्वासार्हता यात पणाला लागेल , त्यामुळे आम्हाला वरवर तरी आम्ही समतोल राखत असल्याचे दाखवावे लागेल. अशी एकारली भूमिका घेता येणार नाही. पण हा समतोल असल्याचा दिखावा साधत तुमचा अजेंडा राबवावयास आमची हरकत नाही. शर्मा यांच्या भाजपच्या राजकीय विरोधकांवर प्रच्छन्न टीका करण्याच्या प्रस्तावावर जैन यांची काही हरकत दिसली नाही. जैन यांच्या भेटी नंतर शर्माची भेट परत एकदा संजीव शहा बरोबर होते. या भेटीत शहा त्याला ५०० करोड रुपयाचे “एस्टीमेट” देतात. वर, टाइम्स प्रकाशने रोज ७ करोड लोकांपर्यंत पोचत असल्याने, हि किंमत कशी वाजवी आहे ते सुध्दा सांगतात.

शर्मा त्याला या पाचशे करोड पैकी एक तृतीयांश रक्कम रोकड स्वरूपात स्वीकाराल का अशी विचारणा करतात. संजीव शहांकडे सगळ्या प्रश्नांवर तोडगे तयार आहेत. ते म्हणतात कि आपण त्रयस्थ मध्यस्थ कंपनीच्या माध्यमातून रोकड रक्कम सफेद करून घेऊ शकतो.  या नंतरची भेट शर्मा, संजीव शहा व विनीत जैन यामध्ये होते. जैन फारसे बोलत नाहीत, संजीव शहाच शर्माना, ते देणार असलेली रोख रक्कम टाइम्सच्या खात्यात सफेद होऊन कशी आणता येईल हे सोप्या भाषेत समजावून सांगत राहतात. विनीत जैन मध्ये मध्ये फक्त हुं, हुं करताना ऐकू येते.

कोब्रापोस्ट ने टाइम्स वृत्तसमूहावर केलेल्या हल्ल्याची कहाणी इथे संपते. खर तर कोब्रापोस्टने हे ऑपरेशन इतर कैक वृत्तसमूहांवर केले आहे, पण घाव जिव्हारी लागलाय टाइम्सच्या. दे वर कॉट पँट्स डाउन ! गेल्या आठवड्यात कोब्रापोस्ट ने टाइम्सवरील स्टिंग ऑपरेशन अगदी विनीत जैन व संजीव शहा यांच्या व्हिडियोसह प्रसिद्ध केल्यानंतर टाइम्सने या पुष्प शर्माची अख्खी कुंडली खणून काढली. पुष्प शर्माला २००९ साली दिल्ली पोलिसांकडून खंडणी उकळण्याच्या गुन्ह्याबद्दल अटक झाल्याची बातमी टाइम्सने २८ मी रोजी छापली. पुष्प शर्मा हा ब्लॅकमेलर असून त्याने जो काही “पुरावा” कोब्रापोस्ट वर व्हिडियोच्या रूपात टाकला आहे तो संपादित असून वेगवेगळे तुकडे जोडून मुद्दाम टाइम्स व इतर प्रतिष्ठित वृत्तसमूहांची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे असा दावा टाइम्स ने केलेला आहे. टाइम्सच्या दाव्यात तथ्थ्य असेलही, पण आश्चर्य एवढ्याच गोष्टीचे वाटते की एक टीनपॉट ब्लॅकमेलर सरळ उठून टाइम्स ग्रुपच्या कॉलरला हात घालतो, टाइम्स ग्रुपच्या विश्वसार्हतेलाच सुरुंग लावतो आणि टाइम्स ग्रुप त्यावर कायदेशीर कारवाईची नोटीसही काढत नाही, प्रत्युत्तरादाखल हा माणूस स्वतःच कसा फ्रॉड आहे याचे रिपोर्ट देत राहते. यातच सत्याचे किती अंश कोणाच्या बाजूने आहेत याचा अंदाज येतो.

कोब्रापोस्टचे हे स्टिंग ऑपरेशन जर खरे असेल, तर राजकीय नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणारा आपला मीडिया, स्वतः किती स्वच्छ आहे याची प्रचिती कोब्रापोस्ट च्या ऑपरेशन १३६ ने आपल्याला दिली आहे.


तीर्थराज सामंत
लेखक राईटअँगल्सचे नियमित वाचक व हितचिंतक आहेत.

Saturday, 26 May 2018

सध्या अनेक लोक "न्यूड" ह्या फिल्मचे कौतुक करताना दिसतात. एखादी फिल्म आवडण्या/ नावडण्या साठी प्रत्येकाची अनेक वैयक्तिक कारणं असू शकतात.एखाद्या स्त्री पत्राला केंद्रस्थानी ठेवणारी फिल्म मराठीत क्वचितच येते. म्हणून मी कुतूहलाने 'न्यूड' पाहिला. त्यातल्या कलाकारांचा अभिनय, गाणी व cinematographyह्या बाबी मला आवडल्या. पण संपूर्ण सिनेमा मात्र आवडला नाही, कारण आशयाच्या मांडणीत कमतरता भासली. आज Shilpa Kamble ने "न्यूड" बद्दल जे लिहिलेेआहे - बरेचसे तसेच माझ्याही मनात येऊन गेले. म्हणून तिने लिहलेले इथे copy करीत आहे. -
 न्यूड ( २०१८) या बहुचर्चीत चित्रपटाला गोवा फिल्म फँस्टीवलला उद्घाटनच्या वेळी झालेला विरोध, परिक्षण मंडळाच्या सुरवातीच्या नकारानंतर ए सर्टीफिकेट मिळवून या चित्रपटाचे झालेले प्रदर्शन या गोष्टीने प्रभावीत होवून मोठ्या अपेक्षेने चित्रपट पहायला गेले, अपेक्षाभंग झाला. पण हे काही नवीन नाही, असे होते कधीमधी आपण चित्रपट पहायला जातो आणि तो फसलेला असतो. न्यूड चित्रपटाने त्यापेक्षा काहीतरी भंयकर केले होते. त्यातील प्रतारणा अधिक सहेतुक होती.त्यामागे राजकारण होतं , सिनेमाचं अर्थकारण होतं, आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे दाभिंकपणा होता .आता हा दाभिंकपणा नेमका काय आहे त्याचा विचार करूया. हा दाभिंकपणा उघड होण्यासाठी या चित्रपटाचे sexual politics काय आहे ते समजून घ्यावे लागेल.’गायनोक्रिटीसिझम’ या एलिन शोवाल्टर यांनी प्रचलीत केलल्या समीक्षेपद्दतीत लेखक स्त्रीपात्रांना कोणत्या विचारव्यूहातून रेखाटतो याचा अभ्यास केला जातो.व त्यामागची अन्यायकारी पुरूषप्रधान विचारपद्धतीची चिकित्सा केली जाते. विल्यम शेक्सपीयर यांच्या Taming of the Shrew मधील गर्विष्ट व नाठाळ नायिका कँथरिना हिला वठणीवर आणण्यासाठी तिचा नवरा Petruchio शाररीक हिंसा, उपासमार, माहेर वर्ज्य, एकाकीपणा, शाब्दीक छळ असे अनेक आयुधे वापरतो.ज्या आधुनिक कथनानुसार घरगुती हिंसाचार या सदरात मोडल्या जाणाऱ्या आहेत. व हा सर्व छळ सहन केल्यानंतर नायिका तिच्या ‘योग्य स्थानी’ येते व व्यवस्थित वागू लागते. या नाटकाचे त्याप्रकारची चिकित्सा पाश्चात्य जगात झालेली आहे. व ती मौलिक स्वरूपाची आहे.तर या पार्श्वभूमीवर आपण न्यूड या चित्रपटाकडे वळूया.
या चित्रपटातील नायिका यमुना, तिची मावशी चंद्राक्का या सोलापूर,पंढरपूर या बहुतेक भागातील मागास समाजातील स्त्रिया आहेत ( भंडारा ,गोंदिया या भागातही हे काम होते पण त्यांची बोलीभाषा इथे वापरलेली नाही. )कारण यमुना जे बिडी वळण्याचे काम करते ते याच भागात चालते व समाजातील गरीब गरजू व प्रामुख्याने मागास, दलित जातीतील बायका हे काम करतात. पेहलवानी करणारा नवरा हा जरी उच्चवर्णीय व उच्चवर्गीय असण्याची शक्यता असली तरी मग त्याची बायको घराबाहेर असंघटीत क्षेत्रात रोजगार मिळवण्याची शक्यता फार कमी आहे.तर भाषा , व्यवसाय, शिक्षण,राहणीमान,मुंबईतील झोप़डपट्टीतील निवारा यावरून हा तर्क बळकट होतो की ग्रामीण भागातील खालच्या जातीच्या स्त्रिया या चित्रपटाच्या कथानकाच्या वाहक आहेत.( उदा.काकस्पर्श-२०१२ या चित्रपटातील केशवापन हि ब्राम्हण स्त्रियांचा विशेष अनुभव आहे.त्या अनुभवावर आधारलेली ती ऱ्हदयस्पर्शी गोष्ट आहे.)
या चित्रपटाची कथावस्तू त्याचे गृहीतत्व सरळसरळ ....स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंतकाळाची माता आहे . या पितृस्ताक विचारसरणीवर आधारलेली आहे. उदा. या चित्रपटातील नायिका यमुना हि जेव्हा पहिल्यांदा जे.जे. मध्ये न्यूड म्हणून पोझ करण्यासाठी येते तेव्हां तिचे मानसिक द्वंदव चाललेले असते. त्यावेळी नेमका कँमेरा एका आईमुलाच्या फ्रेमवर स्थिरावतो. मग ही यमुना आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी तिला मान्य नसलेला व्यवसाय स्वीकारते.मग ज्या शरीरातून दुसऱ्या शरीराचा जन्म झाला त्या शरीराचे भांडवल करून तिला उदारनिर्वाह करावा लागतो. इथे शरिरविक्रीशी संबधित कार्यकर्तीने नमूद केलेला किस्सा आठवतो ज्यावेळी एखादी महिला मारहाण ,धमकी इत्यादी गोष्टी केल्यानंतरही शरिरविक्रय करण्यास विरोध करते तेव्हां तिचे दलाल व मालकिणी तिच्या मुलांना ओलिस ठेवतात व तसे केल्यानंतर ती महिला निरूउपाय होवून शरिरविक्रयास तयार होते. अगदी हाच मुद्दा मदर इंडिया(१९५७)या चित्रपटातही एका प्रसंगात आला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगणारी नायिका ‘लाला’ या बनियाच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडत नसते पण जेव्हां तिची मुले भूकेने अन्न अन्न करून मरू लागतात तेव्हां ती त्याच्यासमोर शरणागती पत्करते .मात्र आयत्यावेळी अन्नाचा शोध लागून ती त्या दृष्कृत्यातून वाचते.
तर न्यूड या चित्रपटातील यमुना नवऱ्याशीही याच गोष्टीने संघर्ष करते की तिला तिच्या मुलाच्या फी भरण्यासाठी पैसे हवेत. आता यमुना ज्या गोष्टीसाठी घर सोडते त्याच गोष्टीसाठी जगही सोडते. तिच्या मुलाला चित्रकार बनवायचे तिचे (ते त्याचेही स्वप्न असते) स्वप्न भग्न पावते व तो आईला रांड म्हणतो .या धक्क्याने ती आत्महत्याचा निर्णय घेवून समुद्रात विलीन होते. म्हणजेच त्या नायिका अनंतकाळाची माताच असते.इथे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला अस्तित्व(२०१०) हा चित्रपट आठवतो. या चित्रपटाची विषय स्त्रीला विवाहबाह्य संबधातून झालेली अपत्य, त्यातून निर्माण झालेला ताण , व उद्धवस्त झालेले कुंटुब असा होता. या चित्रपटात स्त्रीचे स्वतःचे अस्तित्व म्हत्वाचे मानले होते व त्यामुळे नायिक मुलाच्या वाग्दत वधूचा आधार घेत घर सोडते. आपले जगणे संपवत नाही.
न्यूड चित्रपटात खालच्या जाती/वर्गातील स्त्री घेवून तिला वर्ण वर्चस्ववादी भूमिकेतून तयार झालेल्या पुरूषकेंद्री विषमतावादी मानसिकतेतून रेखाटले आहे. तिचे असे चित्रपटातून शोषण करतांना या चित्रपटाचा प्रपोंगडा मात्र असा करण्यात आला आहे की हा चित्रपट आधुनिकता मांडणारा, स्त्रीला मुक्त करणारा आहे. दुर्दैवाने हा चित्रपट खालच्या जाती/वर्गातील बाईचे कथनातून शोषण करणाराच आहे.इथे या चित्रपटात कला, कलेच्या स्वात्र्यांवर येणारा दबाव, झुंडशाही, या भारताला व संपूर्ण जगाला भेडसविणाऱ्या समस्यासंदर्भात काही विधाने केली गेलेली आहेत आणि ती चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत असे भासविले गेले असले तरी ती केद्रंस्थानी नाहीत.कारण एक जगविख्यात चित्रकाराचे दोन सीन, कलामहाविद्यालयावर झालेला हल्ला एक सीन, व महाविद्यालयातील प्रिसींपलचे सात-आठ वाक्य सोडल्यास धर्मसत्ता , संस्कृतीरक्षक यांना आव्हान देणारे काहीही या सिनेमात नाही.हा सिनेमा यमुना या पात्रावरच बेतलेला आहे.चित्रपटात या अर्थाचे एक वाक्य आहे... Just like medical students need bodies for post mortems, art students need nude models for studying painting.
आणि हीच आक्षेपार्ह गोष्ट आहे की कलेसाठी लागणारी ही न्यूड माँडेल्स जिवंत, हातपाय असणारी, चेतना असणारी माणसे आहेत.ती मेलेली शरीर नाहीत. या माँडेल्सवर बेतलेले तुमचे पात्र कितीही काल्पनिक असेल तरी त्याच्या प्रती तुमचे काही उत्तरदायित्व नाही का ? म्हणजे याच दिग्दर्शकाचा नटरंग( २०१०) हा तमाशातील नाच्याच्या जीवनावर बेतलेला चित्रपट घेवूया.यातील ‘गुणा’ हा कलावंत नायक त्याचा रोजगार गेल्याने तमाशाच्या धंद्यात येतो व इथे आल्यावर त्याला काही कारणास्तव नाच्याची भूमिका करावी लागते.या व्यवसायात त्याला मानहानी तर स्वीकारावीच लागते, पण त्याच्यावर शाररीक अत्याचारही होतो, त्याचे कुटुंब त्याला दुरावते,ग्रामस्थ वाळीत टाकतात,धंदा बुडतो पण अशा वेळी तो आत्महत्या करत नाही .तर पुन्हा तोच तमाशा सुरू करतो व त्यासाठी त्याला सहधर्मीही भेटते.मग जे नटरंगमध्ये झाले ते न्यूडमध्ये का झाले नाही....याचे कारण सरळ आहे तो ‘गुणा’ होता ही ‘यमुना’ आहे. आणि हेच ते sexual politics आहे.
जगभरात अनेक अर्थांनी नवीन जीवनमूल्ये देणारा ,शोषणाला नकार देणारा, कलात्मक व त्याचबरोबर आशयघन चित्रपट तयार होत आहे. भारतीय चित्रपटही हम(१९९१) मधील जुम्मा चुम्मा दे पासून पींक(२०१६) नो मीनस नो पर्यंत पोहचला आहे.इराणमधील circle ( 2010) हा इराणमध्ये त्यातील स्त्रीजीवनातील स्फोटक दर्शनाने इराणमध्ये बँन झालेल पण जगभरात गाजलेला चित्रपट पथदर्शी आहेच. पण तद्दन व्यावसायिक असलेल्या हाँलीवूडमध्येही वंशदेवषी वर्चस्ववादी वाह्यात नेत्याला ठणकावून सांगणारे नीडर कलावंत आहेत. मेरील स्ट्रीपने ज्या वाक्याचा पुनर्उच्चार केला की Take your broken heart turn it into Art .त्या वाक्याचा आधार घेतच हे विवेचन संपवते.ऱ्हदयाला सांधण्याची , अलटरनेटीव जग दृश्यमान करण्याची , सत्य निर्माण करण्याची ताकद चित्रपटासारख्या माध्यमात असते.न्यूड या चित्रपटाला हि संधी मिळाली होती.चित्रपट हे माध्यम अतिशय खर्चिक आहे. उत्कृष्ट कलावंत, कँमेरामन, संगीत , निसर्गरम्य लोकेशन ही सारी आयुधे असूनही हा चित्रपट दिशादिग्दर्शक होवू शकला नाही. आशयाच्या पातळीवर या चित्रपटाचे रसातळाला जाण्याचे कारण एकच- परकायाप्रवेश लेखकाला जमला नाही. हाडाचा कलावंत त्याच्या व्यक्तीगत संस्कारातून बाहेर येवून आपल्यापेक्षा भिन्न व्यक्तीला सामावून घेतो त्याच्या सहवेदनेला भोगू शकतो.व त्यातून त्याची पात्रे तयार करतो त्यांच्या जगण्याला अर्थ देतो.
पुन्हा पुन्हा ऐकलेले वाक्य इथे आठवत राहते..If you are caste blind then you are upper caste and if you are gender blind then you are male. मग सांगा आजूबाजूच्या वास्तवावर डोळे झाकून पडद्यावर रंग उधळणारी तुमची हि गोष्ट आंधळेपणाने आम्ही कशी पहावी ? व त्यातून काय अनुभव घ्यावा.

Shilpa A. Kamble Vandana Khare

Monday, 14 May 2018

मराठा महायोद्धा बाजीराव
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून
गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला
सावली सापडत नव्हती…
आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने
देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे
कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर....

त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!
बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित
होतं…
पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव
खरोखर किती मोठा होता हे
आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा
‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व
देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते.
असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव
उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले.
बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.

“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर
इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून
उशीर झाला!"

ह्याला म्हणतात मराठी बाणा!

ह्या कृत्यानंतर बाजीरावाने
बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…
आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय
आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार
असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं…
इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला..
जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल
बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…

घोड्यांच्या टापांनी हादरून
उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही
बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव!
हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही
पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये
विचारल,
"इधर कोई समाधी है क्या?"

" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?"
असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड
होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!
कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,
"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?" रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे
कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…
ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…

गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम... जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर
असावीत!

सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील!
अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला....
सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि
आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक
दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर
नेणारा हाच तो......
बाजीराव!

गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित
स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत
विचारशक्ती!
कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक
व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा
पंतप्रधान!........असो!
तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन!
डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!!
आता काय करायच ह्या विचारत असताना एक
उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी
वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू!
असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची
जाणीव त्या दिवशी झाली!
आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!
आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून
आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?"
असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही
गोष्ट घडली खरी! असो!
मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"
"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे
म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!

हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम
बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या
खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले....

"समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!
पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!!
इतका मान! इतका आदर!!

ते देखील पुण्याहून शेकडो
मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य!

मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या
कडा पाणवल्या!
ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे
देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी.......
"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न
विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे
निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा
गावठी ‘दादासाहब’ कुठे !

मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का
असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत
आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं,
क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!

शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?
कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण
कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना
इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा....
पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि
आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!
परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण
विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!
बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत
परत ऐकू येत होते....

पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!
पेशवा सरकार!!!

मित्रांनो नक्की शेयर करा /|\
http://www.rational-mind.com/पेशवा-सरकार/

वाचल्या बद्दल धन्यवाद्
प्रांजल वाघ.