Saturday, 25 August 2018

*एक वेगळा अनुभव*
उत्तम पडियार
ग्राफॉलॉजिस्ट

तुरुंगात एक कैदी गेली ४ ते ५ वर्ष खुनाच्या case मध्ये आहे. तो माझ्या कडून थेरपी घेतोय.
काल मला त्यांनी विचारलं "मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो का?" मी त्यांच्या प्रश्नांसमोर प्रश्न विचारला "का, वैताग आला का?"
त्यांच्या उत्तराने मी थक्क झालो, मुद्दाम त्यांच्या शब्दात वर्णन करतो "एका महिन्यात माझी जामीन होण्याची शक्यता आहे, मला ही थेरपी पूर्ण केल्याशिवाय जायची इच्छा नाही"
ज्या व्यक्तीने गेली ४,५ वर्ष घर बघितलं नाही, मोकळ आभाळ बघितलं नाही, त्या व्यक्तीला बाहेर जाण्यापेक्षा जास्त काळजी थेरपी पूर्ण करण्याची आहे.

केलेल्या कामाची पावती याहून अधिक चांगली कोणाला मिळाली नसावी.

मी भाग्यवान आहे, graphology ला धन्यवाद

उत्तम पडियार
९४२३६४७०७८
*🤔लोकांना मनुस्मृति आणि संविधाना मधील फरक कळू दया🤔*

📢📢📢📢📢📢📢📢📢📢

👉🏾काय होते या मनुस्मृती*मध्ये जाणून घेऊ या  *संविधान* आणि *मनुस्मृती* यामधील फरकातून:-👉🏾


१) *मनुस्मृती:-*   [1.31, 429, 499] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार *ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र,* हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥



*अर्थ* :- ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.



*२) 👉🏾👹मनुस्मृती:-*[99, 98, 1.91] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्षकीपेशा कोणीही करु शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.



*३) 👉🏾👹मनुस्मृती:-* .[1.88, 98, 90, 130] ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.



*४)👉🏾👹 मनुस्मृती:-* [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.



*👉🏾📓संविधान:-* [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

*५)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.



*६)👉🏾👹 मनुस्मृती:-* [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.


*👉🏾📓संविधान:-* [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.



*७)👉🏾👹 मनुस्मृती:-* [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.


*👉🏾📓संविधान:-* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.



*८)👉🏾👹 मनुस्मृती:-* [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.



*👉🏾📓संविधान:-* मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 *९)👉🏾👹 मनुस्मृती:-* [11.127, 129.30, 10.381] ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

*👉🏾📓 संविधान:-*  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.

*आयपीसी म्हणजे,*
 इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.
आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे.
हा खरा ईतिहास जरुर वाचा..🙏

इंग्रज भारतात आलेच नसते तर?

मित्रहो,
भारताच्या इतिहासाची काही पाने इंग्रज अंमलाची आहेत.त्यांच्या राजवटी विरोधात लिहताना मनुवादी खालील अपप्रचार करतात

1)आम्हाला गुलाम बनवले

2)इंग्रजांनी "फोडा आणि झोडा"नितीचा वापर केला.

3)आमचे धर्मांतर केले

4)आमच्यावर जुलूम केला
आज आपणास हेच पहावयाचे आहे की काय खरेच इंग्रज इतके भयंकर होते?
इंग्रज भारतात आले ते 1600 सालात व्यापार करण्यासाठी.
त्यांनी पहिली गोष्ट न्याहाळली ती म्हणजे भारतात nation-राष्ट्र ही संकल्पना नाही.मात्र जात ही प्रबळ संकल्पना आहे.
जाती या ब्राम्हणांच्या धार्मिक गुलाम आहेत त्यामूळे त्या मानसिक ही गुलाम आहेत.
ब्राम्हण बनिया सोडून सर्व जाती न्यूनगंड आणि नैराश्याने पछाडलेल्या आहेत.
प्रत्येक जात एक राष्ट्रच आहे .त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही.ब्राम्हणांनी प्रत्येक जातीला उपजातीतही विभागून कायमचे फोडले आहे.
इंग्रजांनी असा विचार केला की येथील सर्व जनताच जर ब्राम्हणांची गुलाम आहे तर गुलामांना पराभूत करण्याची गरज नाही.केवळ ब्राम्हणांचे महत्व संपवायचे.बस्स.

1757ला सिराज उद्दौला याचा पराभव इंग्रज का करू शकले.
कारण जगतसेठ,रायदुर्लभ आणिअमीरचंद या तीन ब्राम्हणांचे इंग्रजांना मिळून षडयंत्र करणे होय.
म्हणजेच इंग्रजांची सत्ता भारतात कायम करण्यात सर्वात पुढे ब्राम्हण!
ब्राम्हणांनी असे का केले त्याचे कारण ब्राम्हणांना वाटले मुसलमानी सत्ता गेली तरीही आपणास सत्तेत वाटा मिळेल पण झाले उलटेच

1)इंग्रजांनी प्रथम अस्पृश्य जातींचे सैन्य बनवले.त्यांना प्रशिक्षण दिले.त्यांना शिक्षणसुद्धा दिले.यामूळे ब्राम्हण निराश झाले.

2)इंग्रजांनी पाहिले कि येथील लहान मुलींना ब्राम्हण धर्म धर्म म्हणून पतीनिधनानंतर जिवंत जाळतात.ही पद्धत इंग्रजांनी कायदा करून बंद केली.

3)येथील लोक गुलामीला धर्म मानतात याचे कारण ब्राम्हणांनी येथील लोकांना केलेली शिक्षणबंदी.म्हणून प्रथम येथे इंग्रजांनी शिक्षण सुरू केले.

4)ब्राम्हणांचा "ब्राम्हण पिनल कोड" अर्थात मनुस्मृतीला हद्दपार करून इंडियन पिनल कोड लागू केला आणि "कायद्यासमोर सर्व समान"केले.कलकत्त्यात 1780ला नंदकुमार देव नावाच्या ब्राम्हणाने 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने बिचारी मुलगी मरण पावली.मनुस्मृतीनुसार नंदकुमार देवची शिक्षा काय तर फक्त शेंडी कापणे.पण इंग्रजांनी तर सरळ त्याला फासावर चढवले.

5)हे राज्य आपणास घातक असल्याचे ब्राम्हणांनी ओळखले आणि त्याचा खातमा करण्याची संधी शोधू लागले.
कलकत्ता फलटणीत हौदावर पाणी पिण्यासाठी मंगल पांडे गेला असता तिथे एक अस्पृश्य जातीचा शिपाई नळावर पाणी पित होता.त्यास मंगलने नळ का बाटवलास म्हणून जाब विचारला. त्या शिपायानेही खतरनाक उत्तर दिले."महाशय तुम्ही ब्राम्हण रोजच गायीची चरबी दाताने तोडता तेव्हा तुम्ही बाटत नाही का?"
हे उत्तर ऐकून मंगलने बंड केले राष्ट्रप्रेम होते म्हणून नव्हे.
या बंडातही ब्राम्हणांनी मुसलमानांना पुढे केले.

6)लाॅर्ड डलहौसीने सर्व राज्ये खालसा करून सर्व भारत एक करण्याचा प्रयत्न केला .ते राष्ट्रीय काम असूनही ब्राम्हण त्याला वाईट म्हणतात कारण राष्ट्रीयत्वाने समाज एक होतो.
बंड तर फसले. मग ब्राम्हणांच्या विनंत्या सुरू झाल्या पण इंग्रज हुशार होते त्यांनी ठरवले की येथील जनतेला मुलभूत अधिकारांची सोय केल्याशिवाय व त्याचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय आपण भारत सोडायचा नाही.
1858 च्या कायद्याने संसद निर्माण केली.
नगरपालिकांची निर्मिती केली.आणि ट्रेनिंग द्यायला सुरूवात केली.

7)सन1909,सन1917,सन1927 लोकशाही निर्मितीसाठी कायदे करून प्रतिनिधित्व दिले.याला गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला त्यात अडाणी जनता साथीदार झाली.

8)इंग्रजांनी 1942 ते1982 हा सक्तीच्या शिक्षणाचा फार्म्यूला बनवला होता.तो जर यशस्वी झाला असता तर आपल्यात स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे लोक निर्माण झाले असते.आणि सच्चे प्रतिनिधी आमच्या समस्या घेऊन संसदेत लढले असते.नोकर्यात sc,st,obcप्रबळ झाला असता
हे होवू नये म्हणून गांधी आणि काॅग्रेसने विरोध केला

9)आपणास असे सांगितले जाते की 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज निघून गेले.साफ चूक. संविधान पूर्ण होईपर्यंत इंग्रज भारतात होते.1952च्या प्रथम निवडणूकीनंतर त्यांनी देश सोडला.
इंग्रजांनी आपणास माणसात आणले त्यानाच आपण नावे ठेवतो.इंग्रज आलेच नसते तर भाऊ आम्ही अजून जनावरच असतो
घटना कोण बनवणार? याचा शोध सुरु झाला. हे वृत्त ब्रिटिशांना कळताच गांधी आणि नेहरुची चांगली कान उघडणी ब्रिटिशांनी केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समिती मध्ये स्थान द्या अशी "Order" दिली. म्हणुन नाइलाजाने गांधी आणि कॉग्रेसला बाबासाहेबांना घटना समिती वर सदस्य म्हणुन घ्यावं लागले. या कार्यासाठी सात सदस्सीय समिती गठीत करण्यात आली.

१ . सदस्य आजारी पडला.

२ . सदस्य विदेशी गेला.

३. सदस्य वैयक्तिक कामात व्यस्त राहिला.

४. सदस्य राजकारणात व्यस्त होता.

५. सदस्याचा मृत्यू झाला.

६. सदस्याला बाबासाहेबांचा विटाळ होत असे.

7. शेवटी एकट्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ - २१ तास अभ्यास करुन राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

पुढे संविधान सभेत प्रश्न चर्चेस आला. नव्याने तयार झालेल्या भारतीय संविधानाची सुरुवात कशी कशी करावी..?

१. मौलाना हजरत मोहली उठले आणि म्हणाले "अल्लाह"च्या नावाने करा.

२. पंडीत मदन मोहन मालवी उठले आणि म्हणाले "ॐनमःशिवाय" ने करा.

३. एच पि. कामत उठले आणि म्हणाले "ईश्वर" या नावाने कारा.

4. डॉ. बाबासाहेब उठले आणि म्हणाले "लोकांच्या" नावे करा.

या मुद्द्यावर मतदान झाले "६८ मतं लोकांच्या" नावावर मिळाली आणि "४१ मतं देवाच्या" नावाला मिळाली आणि संविधानाची सुरुवात "we the people of India" "आम्ही भारताचे लोक "अशी झाली . भारतातील पहिल्याच मतदानात दगडाचे देव हारले आणि माणूस जिंकला, बाबासाहेब जिंकले.

पुढे बाबासाहेबांना हे कळले होते की पूढे या देशाचे नाव बदलुन "हिंदुस्थान" करतील.. म्हणुन राज्यघटनेतील कलम "३९५ मधील "अ" प्रमाणे भाषांतर केले. "India that is BHARAT" इंडिया म्हणजे भारत अशी पुष्टी जोडली
"देव मंदिरात असता,
तर मंदिरा बाहेर बसून भीक मागण्याची वेळ
कोणावरही आली नसती,

*🙏मी देवाला पूजत बसलो असतो तर,माझ्या समाजाला भीक मागायला लागली असती...🙏"*

*डॉ : बाबासाहेंब आंबेडकर*

Monday, 20 August 2018

*समुपदेशन...*
*एक चांगला मेसेज* अभय शरद देवरे


मागच्याच महिन्यात माझे एक टेम्पोचालक  परिचित त्यांच्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हणाले, "या आमच्या मुलाला दुकानात ठेवून घ्या." पण मी त्यांना म्हटलं की "असं कसं घेणार ? त्याचे वय अठरा नाही त्यामुळे मी त्याला नोकरी देऊ शकत नाही." त्यावर ते म्हणाले, "नोकरीला म्हणून ठेवून घेऊ नका. त्याला पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही. दहावीची परीक्षा झाली आहे तो मोकळाच आहे. शिक्षणातही त्याला फारशी गती नाही. जर तुमच्याकडे काम केले तर त्याला अनुभव येईल आणि तुमच्याकडे चांगले संस्कार घडतील." शिक्षणासाठी त्या मुलाला ठेवायचे म्हटल्यानंतर मी तयार झालो. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून यायला लागला. त्याच्या प्रकृतीला, उंचीला झेपेल इतकेच काम त्याला द्यायला सुरुवात केली. तोही तसा बर्‍यापैकी प्रामाणिकपणे काम करत राहिला. त्याचे मित्रही अधूनमधून यायचे आणि त्याच्याशी काहीतरी बाहेर जाऊन बोलायचे. पण मी फारसे लक्ष दिले नाही. एक महिन्यांमध्ये त्याने सहा दांड्या सुद्धा मारल्या पण तेसुद्धा स्वीकारले.  कारण तो शिकायला आलेला होता. जरी त्याचे वडील म्हणाले होते की मुलाला तुम्ही काहीही देऊ नका तरी त्याच्याकडून फुकट काम करून घेणे मला प्रशस्त वाटले नसते.  महिना झाल्यानंतर मी त्याला अडीच हजार रुपये पगार घ्यायचा ठरवला. आणि सांगितलं की आज पहिल्या महिन्यात मी तुला अडीच हजार रुपये पगार देतो तीन महिन्यांमध्ये तुझे काम बघून वाढवतो सहा दिवसाच्या सुट्या वजावट करून उर्वरित पगार त्याच्या हातावर ठेवला तेंव्हा तो नाराज झालेला दिसला पण माझ्या व्यवसायातली काहीही माहिती नसलेल्या आणि केवळ शिक्षणासाठी म्हणून दुकानात आलेल्या मुलाला अडीच हजार रुपये हे विद्यावेतन म्हणून योग्य आहे असे मला वाटले. शिवाय उद्या त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेजची वेळ सांभाळून इथे काम करण्याची सवलतही त्याला दिली होती. आणि त्याच्या वडिलांनी  माझ्यावर संस्कार करण्याचीही जबाबदारी टाकली होती त्यामुळे सध्या प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धा, त्याला तोंड देण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी हळूहळू समजावून सांगत होतो. शिवाय व्यवसाय चालवायचे मला जेवढे ज्ञान आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करत होतो, तेसुद्धा त्याला विद्यावेतन देऊन ! त्याने काहीतरी चांगले वाचावे म्हणून मी त्याला भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांचे ' माती, पंख आणि आकाश ' हे आत्मचरित्र वाचायला दिले. मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा स्वकर्तृत्वावर किती मोठा होऊ शकतो हे त्याला कळावे व त्याच्या मनात कष्टाचे स्फुल्लिंग जागृत व्हावे हा माझा उद्देश ! पण पठयाने त्यातील एकही ओळ वाचली नाही आणि पुस्तक परतही केले नाही. शेवटी मीच आठवण करून दिल्यावर वडिलांनी आणून दिले.
नाराजीने त्याने पगार घेतला आणि त्यादिवशी दुकान संपल्यावर जो गेला तो आज पर्यंत परत आला नाही. त्याला पहिल्या पगारातच स्मार्टफोन घ्यायचा होता असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दहावीसुद्धा न झालेल्या मुलाला महिना दहा हजार रुपये पगार मीतरी देऊ शकत नव्हतो.
हीच गोष्ट माझ्या एका प्लम्बिंग कॉन्ट्रॅक्टर मित्राला सांगितली कारण मुलाचे वडील आम्हा दोघांचेही कॉमन मित्र ! मित्र म्हणाला, आपल्या मराठी मुलांना अनुभव न घेताच पगार हवा असतो त्यामुळे बाहेरची मुले येऊन नोक-या घेऊन जातात. त्याने एक उदाहरणही दिले. सातारच्या हायवे जवळ एक नवीन चारमजली कपड्यांचा मोठ्ठा मॉल झाला आहे. तिथे त्याचे प्लम्बिंगचे काम चालू आहे.  मालक सिंधी आहे. मॉलमध्ये दीडशे मुले काम करतात. सगळी मुले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथील आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास ड्युटी असते. सर्व मुलांची राहण्याची, जेवणाची सर्व सोय मालकाने केली आहे. सगळी मुलं इतक्या तन्मयतेने काम करतात की आलेला ग्राहक खरेदी न करता परत जातच नाही. आता हीच मुले सर्व शिकून घेतील आणि भविष्यात आपल्या महाराष्ट्रात स्वतःची दुकाने उघडतील. आपल्या नाकर्तेपणामुळे एकाच ठिकाणच्या दीडशे नोक-या आणि संधी गेल्या की हो ! याचा खेद, खंत आहे कोणाला ? आणि आमची मराठी मुले शिवाजीमहाराजांसारखी दाढी वाढवून, चंद्रकोरीचे गंध लावून, वडिलांनी घेतलेल्या बुलेटला भगवा झेंडा लावून फिरतात ! शिवाय तथाकथित मराठीप्रेमी नेते या मुलांना तोडफोड करायला लावून त्यांचे आयुष्य बरबाद करतात...... अरे, या अमराठी लोकांना हाकलून दिले तर त्यांचे काम किती मराठी तरुणांना येते ? सुतारकाम, गवंडीकाम, टाईलफिटर असे कितीतरी व्यवसाय मराठी व्यावसायिकांच्या हातातून निघून गेलेत. मी माझ्या दुकानासाठी कामगार पाहिजे अशी जाहिरात देतो तेंव्हा आलेल्या उमेदवारांची मी मुलाखत घेण्यापूर्वी ती मुले माझीच मुलाखत घेतात. त्यांचे तीन प्रश्न ठरलेले असतात, पगार किती देणार ? सुट्टी केंव्हा असते ? आणि कामाचे तास किती ? पण कोणीही विचारात नाही की काम काय आहे ?  त्यामुळे आता या मराठी मुलांचा भविष्यकाळ काय असेल या विचाराने माझा थरकाप होतो.
या सर्वाला आपण पालक जबाबदार आहोत असे वाटते. आपण आपल्या मुलांच्याभोवती अती सुरक्षिततेचे कवच निर्माण केले आहे. त्यांना जगाचा अनुभव घेण्यासाठी बाहेर फेकून द्यायला हवे. एकापत्य संस्कृतीत नको तेवढे मुलांना जपत आहोत आपण.  मागितले की सारे क्षणार्धात त्यांच्यासमोर हजर करत आहोत आपण त्यामुळे कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवावी लागते हेच मुलांना माहीत नाही. दोष मुलांचा नाही, आपला आहे. आपण कष्टात दिवस काढले, मुलांना कशाला त्रास हा विचार त्यांची भवितव्य बिघडवतो आहे हे आपल्याला कधी कळणार ? आज जेंव्हा रोज पिझा, बर्गर खाऊन थूलथूलीत झालेली अन कानात बुचे घालून मोबाईलसमोर वाकलेली मुले पाहतो तेंव्हा त्यांच्या पालकांनाच समुपदेशनाची गरज आहे असे वाटते. 

*@ अभय शरद देवरे*
मराठी माणसाने बनवलेली सामान्यांची कार -
‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जात असे आणि ती कार बनवली होती एका मराठी माणसाने. शंकरराव कुलकर्णी त्यांचं नांव. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं. इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. कारची किंमत होती १२००० रुपये. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिन देखील भारतीय बनावतटीचं होतं. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या १५ जणांच्या टीमसोबत १९४५ मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केलं. १९४९ मध्ये शंकररावांनी या कारचं पहिलं मॉडेल तयार केलं. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसं बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून ५ मॉडेल त्यांनी बनवले. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक होता एम.एच.के.१९०६. इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते, परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथं ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. १९७५ साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. परंतु लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे  पुढे या प्रकल्पाचं पुढं काहीच होऊ शकलं नाही. मीरा कारचं मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्येक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती, तसंच अनेक शासकीय परवानग्या देखील गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय त्याच काळात सुजुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरु करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरं जावं लागलं.
वॉटस् ॲपवरून